करोना लॉकडाउनमुळे रेस्तराँ, हॉटेले बंद आहेत. या क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारने कुठलेही आर्थिक पॅकेज दिलेले नाही. यामुळे देशभरातील ७० टक्के रेस्तराँ बंद पडण्याची भीती हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे. याचा सर्वाधिक फटका आर्थिक राजधानी मुंबईतील हॉटेलांना बसण्याची भीती आहे.
लॉकडाउनची पहिली सुरुवात रेस्तराँ, हॉटेले व मॉल बंद होऊन झाली. त्यामुळे अन्य क्षेत्रांच्या तुलनेत रेस्तराँ १० दिवस आधीच बंद झाले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये हॉटेल, रेस्तराँ किंवा पर्यटन क्षेत्राला कोणताही आधार मिळाला नाही. या व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे (एफएचआरएआय) उपाध्यक्ष व पश्चिम भारत हॉटेल अॅण्ड रेस्तराँ असोसिएशनचे अध्यक्ष गुरबक्षीस सिंग कोहली यांनी सांगितले, 'हॉटेल, रेस्तराँ व एकूणच पर्यटन क्षेत्राकडून १७ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळतो. हा आकडा जीडीपीच्या दहा टक्के आहे. या क्षेत्रात ४ कोटी ३० लाख नोकऱ्या आहेत. हा आकडा देशातील एकूण रोजगाराच्या नऊ टक्के आहे. यामुळेच या क्षेत्राला आर्थिक मदतीची नितांत गरज होती. पण केंद्र सरकार त्याबाबत उदासीन आहे.'
हॉटेल्स बंदच ! पॅकेजमध्ये कोणतीही मदत नाही
Reviewed by Velapur Live
on
20:24:00
Rating: 5
No comments