रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या वतनी जमिनी बाबत व विविध मागण्यांचे निवेदन
मुंबई येथे रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या वतनी जमिनी बाबत व विविध मागण्यांचे निवेदन शरद पवार (खासदार व माजी कृषीमंत्री भारत सरकार) यांना देण्यात आले. यावेळी रामोशी, बेरड, बेडर समाजाचे राष्ट्रीय नेते, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते.मा.श्री.दाैलतनाना शितोऴे साहेब, मा.श्री.उत्तमरावजी जानकर साहेब (जेष्ठनेते धनगर समाज म.रा.), मा.श्री.सुधीरजी दादा नाईक (युवक उपाध्यक्ष - म.रा.), मा.श्री.प्रशांत भाऊ बोडरे (युवक अध्यक्ष - मुंबई) उपस्थित होते.
यावेऴी मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब म्हणाले की रामोशी समाजाच्या मागण्या बाबत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेण्यासाठी मी पुढाकार घेईन तसेच विस्कऴीत झालेला रामोशी, बेरड, बेडर समाज हा दाैलतनानांनी एकत्र आणला आहे व समाजानेही दाैलतनानांना साथ दिल्याबद्दल अभिनंदन.
*विषय - रामोशी, बेरड , बेडर वतनी जमीन बाबत व विविध मागण्या बाबत*
महोदय-
महाराष्ट्रातील बेरड , बेडर रामोशी समाज हा क्रांतीकारी व लढवय्या समाज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी महान गुप्तहेर बहिर्जी नाईक व रामोशी समाज यांची अलौकिक केलेली कामगिरी पाहून केलेल्या शाैर्याचा मोबदला म्हणून बेरड, बेडर रामोशी समाजाला आपली उपजीविका करण्यासाठी ईनाम म्हणून वतनी जमिनी दिल्या गेल्या होत्या तसेच अनेक गडकिल्ल्यांच्या रखवालदारीचे काम देण्यात आले होते. पुढे इंग्रज सत्तेचा अमल सुरू होताच गडकिल्ल्याच्या रलवालदारीसह अनेक ठिकाणच्या वतनी जमिनी देखील काढून घेण्यात आल्या त्यातच गुन्हेगारी जमातीचा कायदा लागू करून रामोशी, बेरड, बेडर समाजाला बेरोजगार व भूमिहीन करण्यात आले. गुन्हेगारी जमातीच्या कायद्यामुऴे रामोशी, बेरड, बेडर समाजातील लोकांना द-या खो-यांचा आश्रय घ्यावा लागला सदर आन्याया विरूध्द रामोशी समाजातील आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्वराज्याची प्रेरणाघेवून इंग्रजी सत्तेविरूध्द सशस्त्र क्रांतीच्या दिशेने पहीले पाउल टाकून खुप मोठा लढा उभारला पुढे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना इग्रंजांनी फासावर लटकवले .
व त्यांचे शव तीन दिवस झाडावर लटकून ठेवले कारण इग्रंज सत्ते विरुद्धाचा संघर्ष बेरड बेडर रामोशी समाजाने सुरू ठेऊ.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रामोशी, बेरड, बेडर समाजातील अशिक्षीत पणाचा , व्यसनाधिनतेचा गैरफायदा घेऊन व त्यावर आपला बेकायदेशीरपणे कब्जा आनाधिकृतपने ठेवला त्याच्यातच भर म्हनून सदर जमिनीच्या हस्तांतरनास ज्या जाचक आटी होत्या त्या शिथिल झाल्याने धनदांडग्यांनी रामोशी समाजातील लोकांना फसवून त्या वतनी जमीनीवर हस्तांतर करने व जबरदस्तीने अथवा फसवनूक करून सदर वतनी जमीनींचे व्यवहार करन्यास सुरवात केली त्याचा परीनाम रामोशी, बेरड, बेडर समाज हा भूमिहीन होणयाच्या मार्गावर आहे.
सदर वतनी जमिनी ज्या रामोशी लोकांच्या नावे होत्या त्या परत मुऴमालकाच्या नावे करावेत तसेच खरेदी विक्री बाबत जो जी आर शिथिल करण्यात आला आहे तो जी आर रद्द करण्यात यवा.
आमची शासनाला विनंती आहे की वतनी जमिनी चे जे खोटे व्यवहार झालेले आहेत.
वतनी जमिनी च्या व्यवहाराची चौकशी करून ती जमीन मुळ मालकाला देण्यात यावी.
व राज्यातील ६० लाखाहून आधिक लोकसंख्या असना-या रामोशी, बेरड, बेडर समाजाला न्याय मिऴावा ही विनंती.
रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या मागण्या खालील प्रमाणे
*१) रामोशी वतनी जमीनी चे रिग्रँड झाल्यानंतर त्या जमीनी कुऴ लावन्यात आल्या आहे ते रद्द करण्यात यावे.*
*२) जमिनी धारण करणा-याचे नाव वतनी जमिनीच्या मालकी सदरी लावन्यात आले आहे ते रद्द करण्यात यावे.*
*३ ) जिल्हाधिकारी यांची पुर्व परवानगी न घेता खरेदी खत करण्यात आलेली आहेत ते खरेदी खत बेकायदेशीर असल्याने ते रद्द बातल करण्यात यावेत*
*४ ) २००२ व २००८ चा जी आर रद्द करून त्या आंतर्गत झालेले सर्व व्यवहार रद्द करावेत.*
*५ ) आनाधिकृत धारकाने तिप्पट शेतसारा न भरता आथवा नझरान्याची रक्कम न भरता बेकायदेशीर पणे स्वताच्या नावाची नोंद करून घेतलेले आहे ती रद्द करण्यात यावी*
*६ ) वतनी जमीनी ठरावीक मुदतीसाठी भाडेपट्याने दिलेल्या आसतांना त्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्या नंतर त्या जमिनी मुळ मालकाना परत न करता बेकायदेशीरपने आनाधिकृत धारकाने स्वताच्या नावाची नोंद त्या वतनी जमिनीच्या बेकायदेशीरपने ७/१२ ला लावून घेतली आहेत ते रद्द करण्यात यावेत*
*८ ) रामोशी समाजाला कुठलाही पुर्वापर धंदा व व्यवसाय नाही गडकिल्लेवर रखवाली करने हे त्यांचे काम होते ते काम काढून घेतल्यानंतर या समाजाला उपजिविकेचे साधन राहीले नाही तो रानावनात भटत तो रानवासी झाला यामुऴे रामोशी, बेरड, बेडर समाजाचे तरूण बेरोजगार झाले आहेत आज रोजी या समाजाचे रखवालदारीचे काम हे पोलिस व आर्मी करत आहे यामुऴे या समाजावर बेरोजगारी व उपासमारीची वेऴ आल्याने या समाजाला पोलिस व आर्मी खात्यामधे रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या तरूणांना राखीव जागा मिऴाव्यात ही विनंती.*
*९ ) वतनी जमीन हस्तांतरणाचा अधिकार नसलेल्या अधिका-यांनी रामोशी वतनी जमिनी सरकार जमा करून घेतले आहे त्या बिनशर्त परत मिऴाव्यात.*
*१० ) रामोशी समाजातील लोकांचा वतनी जमिनीवर ७/१२ वर सदरी नोंद असताना धनदांडग्यांनी दडपशाहीने बेकायदेशीपने सदर जमीनीचा ताबा स्वाता कडे ठेवला आहे तो ताबा रामोशी समाजातील मुऴ मालकांना मिऴावा.*
*११ ) काही रामोशी वतनी जमिनी वर सरकार व फाँरेस्ट चे नाव लागलेले आहे ते कमी करून मुऴ मालकाचे नाव लावून त्या वतनी जमिनीचा ताबा मिऴावा.*
*१२ ) मागील सरकारने रामोशी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे महामंडऴाची स्थापना करून १०० कोटीची निधीची घोषणा केली होती तो निधी आपल्या सरकाने लवकरात लवकर रामोशी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी उप्लब्ध करून द्यावा ही विनंती.*
*१३ ) रामोशी, बेरड, बेडर समाज हा एकच असून या समाजाला विविध राज्यात विविध नावाने ओऴखले जाते त्यांचे रोटी बेटी व्यवहार होतात, त्यांचे देव देवता, एकच आहेत, लग्न, बारशे, नाव ठेवने, वर्षश्राध्द याची परंपरा एकच आहे* *आसे आसताना बेडर समाजाला आनुसूचित जातीचे आरक्षण मिऴाले आहे मात्र रामोशी, बेरड समाज हा विमुक्त जातीमधे आहे.*
*तरी रामोशी व बेरड समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिऴावे ही विनंती.*
*१४ ) रामोशी, बेरड, बेडर समाजाचा विकास आराखडा तयार करण्यात यावा.*
*१५ ) रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या भबमिहीन लोकांना नविन शेत जमिन खरेदी करते वेळी शेतकरी कुटूंबातील असल्याचा दाखला अथवा शेतीचा ७/१२ जोडण्याची अट शिथिल करण्यात यावी.*
रामोशी, बेरड, बेडर समाजाचा मागण्यांचा सहानभूतीपुर्वक विचार करावा.
तसेच येणा-या अधिवेशन काऴत पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व मुंबई आझाद मैदान येथे लाखोंच्या संखेने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
No comments