सरकारी कामांसाठी जाताना आता सातबारा नेण्याची गरज नाही!

ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य शासनानं लाखो शेतकऱ्यांचे डिजिटल सातबारा (7/12) उतारे संगणकावर उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही सरकारी कामासाठी शेतकऱ्यांना सातबारा घेऊन जाण्याची भासणार नाही.

शेतकऱ्यांंना सातबारा (7/12) मिळवण्यासाठी मोठी पळापळ करावी लागते. मात्र, आता शेतकऱ्यांच्या मागे असणारी सातबाऱ्याची कटकट मिटण्याची शक्यता आहे. कारण शेतकऱ्यांचे सातबारे (7/12) संगणावर अपलोड करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना आता कोणत्याही कार्यालयात काम असल्यास संबंधित कार्यलयाकडे शेतकऱ्यांचे डिजिटल सातबारा (7/12) उतारे संगणकावर उपलब्ध असणार आहेत.

No comments