२३ मार्च, मुख्यमंत्री पत्रकार परिषद । सविस्तर मुद्दे

#CoronaInMaharashtra 
राज्यात आजपासून संचारबंदी; जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लाईव्ह प्रसारणात माहिती. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत,आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही, तर जगात होते आहे तसे थैमान होईल- मुख्यमंत्री

#FightAgainstCOVID19  
कालचा दिवस होता त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे, सर्वांनी #जनताकर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होते- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#FightAgainstCOVID19  
काल राज्यात १४४ कलम लावले होते आता मला राज्यात  संचारबंदी लावावी लागते आहे. खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा,टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#FightAgainstCOVID19  
काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद  केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली. देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#FightAgainstCOVID19  
जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#FightAgainstCOVID19  
सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद राहतील, प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत. सर्व माध्यमांना देखील मी धन्यवाद देतो. कोरोनाविषयी आपण चांगली जनजागृती करीत आहात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#FightAgainstCOVID19  
ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक. घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत, ही कठोर पाउले केवळ जनतेच्या हितासाठी आहेत. खूपदा विनंती करूनही पालन होत नसल्याने नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे- मुख्यमंत्री

No comments