त्यांना भारतात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न व्हावेत : अँड. सुजित थिटे

सोलापूर जिल्ह्यातील भाविक इराण येथील तेहरान येथे कोरोनो व्हायरस च्या संशयामुळे अडकले असून त्यांना भारतात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न व्हावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड. सुजित भाऊ थिटे यांनी केली आहे. 
देवदर्शनासाठी जाताना तेहरान या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज व सांगोला येथील ४४ भाविक तेहरान येथे अडकले असून भारत सरकार कडून तेहरान - मुंबई या विमानाला उतरण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे. त्यामुळे हे भाविक तेहरान या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत हे भाविक तातडीने भारतात आणावेत अशी आग्रही मागणी अँड. थिटे यांनी केली आहे. 

No comments