दिल्लीतील दंगलीची १०० टक्के जबाबदारी केंद्राचीच: पवार
दिल्लीतील दंगलीची १०० टक्के जबाबदारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचीच असून ही दंगल रोखण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्तव्येही या दंगलीला कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
No comments