IB अधिकाऱ्याच्या हत्येवर मोदी गप्प का?: ओवेसी


ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आयबी (गुप्तचर विभाग) अधिकारी अंकित शर्मांच्या हत्येवरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधलंय. हिंसाचारात अंकित यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत अनेक नागरिकांनीही जीव गमावला आहे. एवढी गंभीर घटना घडूनही पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? असा सवाल ओवेसींनी केला. देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या दिल्लीतील दंगलीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही कल्पना आहे की नाही? असं म्हणत ओवेसींनी मोदींवर हल्लाबोल केला.

No comments