रत्नाई कृषि महाविद्यालय,अकलूज मधील विद्यार्थ्यांची राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कृषि क्षेत्र अधिकारी पदी निवड
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन, ज्याला आयबीपीएस म्हणून ओळखले जाते ही एक स्वायत्त संस्था आहे. हे एसबीआय वगळता सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भरती परीक्षा घेते. या वर्षी महाविद्यालयामधील एकूण आठ विद्यार्थ्यांची निवड झाली.यामध्ये करण पानसरे, पल्लवी पवार यांची कॅनरा बँक; सोनाली सूर्यवंशी,प्रसन्नजीत क्षीरसागर, ऋषिकेश नवले,अभयसिंह भोसले, प्रविण जाधव यांची बँक ऑफ इंडिया तसेच मनोज कांबळे यांची कार्पोरेशन बँक मध्ये कृषि क्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाली.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष मा. जयसिंह मोहिते पाटील, संचालक मा. संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका मा. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजित रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलावडे यांनी अभिनंदन केले.
No comments