माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध ठिकाणी शेतकरी सन्मान दिवस साजरा करण्यात आला
शेतकऱ्यांचे दैवत माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या आदेशाने....
16 मे हा दिवस किसान सन्मान दिवस म्हणजे सन्मान दिवस माळशिरस तालुक्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. एकूण २०लाख कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने जाहीर केले त्यामध्ये 12 कोटी शेतकरी आणि 15 कोटी शेतमजुरांचा काहीच विचार केलेला दिसत नाही. जे काही मदत केल्याची ती तुटपुंज्या स्वरूपाची व तोंडाला पाने पुसली. आहेत अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने कसल्याही प्रकारचे माझ्या शेतकऱ्याला संरक्षण नाही. तरीसुद्धा हा शेतकरी 135 कोटी जनतेला त्याला खायला मिळावं म्हणून जीव धोक्यात घालून शेतीमध्ये काम करतोय खऱ्या अर्थाने सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये शेतमजूर व शेतकरी यांचा काहीच विचार केला नाही. जी काही मदत केली आहे ती तुटपुंजी आहे तोंडाला पाणी पुसणारी आहे. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे संरक्षण मास्क नाही. पी.पी. कीट नाही. तरीसुद्धा हा शेतकरी १३५ कोटी जनतेला दोन टाइमचे खायला मिळावं म्हणून काम करताना दिसतो..
16 मे सकाळी नऊ वाजता संघटनेचे मार्गदर्शक उद्योजक, टी,एस, काळे, (साहेब) जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, यांच्या मार्गदर्शनाखाली....
स्वाभिमानीचे जिल्हाउपाध्यक्ष भीमराव फुले यांनी (दहिगाव) येथे, स्वाभिमानीचे गोपाळ (काका) घार्गे व अमरसिंह माने-देशमुख (वेळापूर,) स्वाभिमानीचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर(विझोरी) अजित कोडग व दशरथ मोरे-पाटील( तोडले-बोंडले) दत्तात्रेय भोसले (सदाशिवनगर) दतात्रय ठवरे (खुडूस) येथे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला शेतामधून घरांमधून जिथे असेल त्या ठिकाणाहून हातामध्ये शेतामधील उपयुक्त साधने घेऊन बरोबर पाच मिनिटं !...मी योद्धा शेतकरी..! कोरोना योद्धा शेतकरी....! तुम्हाला गर्वाने सांगतो मी शेतकरी आहे...! अशा प्रकारचा हा कार्यक्रम माळशिरस तालुक्यात विविध ठिकाणी राबविण्यात आला. व दिवसभर शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
No comments