बँक हप्ते भरण्यास त्रास देतेय? या नंबर वरती करा तक्रार !
शासकीय, खाजगी बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था यांनी ३१ ऑगस्टपर्यंत कर्ज वसुली करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले.
जिल्ह्यात बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था कर्ज वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयोजित सर्व बँकांचे प्रतिनिधी, वित्तीय संस्था प्रतिनिधी, कर्जदार, लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते.
बँकांनी कर्जाच्या परतफेडीबाबत ग्राहकांना माहिती द्यावी, जे ग्राहक स्वतःहून पैसे भरत असतील तरच भरून घ्या, असेही त्यांनी सांगितले. याबाबत कोणत्याही ग्राहकांना काही तक्रार असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक 18001021080 यावर संपर्क साधावा.
No comments