गुडन्यूज । आता मंगलकार्यालये सुरू होणार !
गेली 3 महिने लॉक डाऊन सुरू झालेपासून मंगल कार्यालय बंद आहेत त्यामुळे अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र मंगल कार्यालय सुरू झाले असले तरी याबाबत नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत ही कार्यालये वापरता येणार आहेत. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर आदींबाबत कडेकोट नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
घरी लग्ने लावण्यास अनेक ठिकाणी अडचण निर्माण होत असून कार्यालयाशी निगडित असणाऱ्या कामगारांवर येणाऱ्या उपासमारी मुळे हा निर्णय स्वागतार्ह ठरणार आहे.
No comments