राज्यातील धरण क्षेत्रात फक्त २८ टक्के पाणीसाठा


Only-28-percent-water-storage-in-the-dam-area-of-​​the-state

राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये यंदा तब्बल ४०२.९५ टीएमसी २८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे.

मराठवाड्यातील ९६४ लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये ६७.५९ टीएमसी (२६ टक्के) पाणी आहे.
🔸 मोठया ४५ प्रकल्पांमध्ये ५८.४१ टीएमसी (३७ टक्के)
🔸 मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ५.५१ टीएमसी (१५ टक्के)
🔸 लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ३.६७ टीएमसी (६ टक्के )

जायकवाडी धरणात ३०.८२ टीएमसी (५५ टक्के ) चल पाणीसाठा आहे. धरणातील अचल पाणीसाठा विचारत घेतल्यास धरणात ५६.८८ टीएमसी पाणीसाठा आहे.

पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील प्रमुख धरणांमध्ये सध्या १२०.९६ लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये ६७.५९ टीएमसी (२६ टक्के ) पाणी आहे.

उजनी धरणाचा पाणीसाठा अचल पातळीत आहे. मात्र एकूण अचल पातळीचा विचार करता धरणात उजनीत ५८.७३ टीएमसी पाणीसाठा आहे.

कोयना धरणाच्या चल आणि अचल पातळीत मिळून ३५.६१ टीएमसी पाणीसाठा आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये १००.७० टीएमसी ( २३ टक्के) मध्यम ५० प्रकल्पांमध्ये १५.२३ टीएमसी (टक्के ३२)

कोकण विभागात सर्व प्रमुख धरणांमध्ये ५३.४९ टीएमसी (९४६ टक्के ) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी या धरणांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा होता.

No comments