राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची तातडीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाविकास आघाडी सरकारचे कर्ते सर्वते शरद पवार यांचा विरोध असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक तातडीने बोलविण्यात आली आहे. शरद पवार हे नाशिकला वकिल परिषदेच्या समारोपाला उपस्थित राहण्यासाठी आले असताना तातडीने ते मुंबईला गेले. जळगाव येथे बोलताना त्यांनी हे सरकार पाच वर्षे टिकेल, असे सांगत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची तातडीने बैठक बोलविली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी बैठक घेण्यात येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
एल्गार परिषदेतील पोलिसांच्या सहभागाची चौकशी करावी, यासाठी ठाकरे यांच्यावर दबाव आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, दर महिन्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ मंत्र्यांची बैठक घेण्यात आली होती. ही बैठक ८ दिवसांपूर्वीच निश्चित करण्यात आली होती, असे सांगण्यात येत आहे
No comments