गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे शासनाची जबाबदारी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद रायगड आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.


No comments