ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने शिक्षणाचे जाळे विणले : न्या. गीता बनकर



आज इंग्रजी माध्यमातील शाळांची संख्या वाढत असली तरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे . कारण या शाळामधून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे . ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने शिक्षणाचे जाळे विणले आहे . त्याचा उपयोग करुन घ्या असे मत अहमदनगरच्या धर्मादाय आयुक्त न्या . गीता बनकर यांनी व्यक्त केले . 
वेळापूर येथील चव्हाणवाडी जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित समारंभात न्या बनकर बोलत होत्या . अध्यक्षस्थानी मयूर पाटील हे होते . 
न्या . बनकर म्हणाल्या , जीवन ही एक सायकल आहे . स्त्री व पुरुष ही या सायकलची दोन चाक आहेत . ती व्यवस्थित चालली तरच जीवन यशस्वी होते . 
मयूर पाटील म्हणाले , संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे . 
वेळापूर परिसरात संगणकाचा चांगला प्रचार व प्रसार झाला आहे . आता तालुक्यात संगणकाचे जाळे विणू असे ते म्हणाले .
या प्रसंगी सभापती प्रताप पाटील , पोलिस उप निरीक्षक दीपक जाधव , शिक्षणाधिकारी देशमुख , ॲड प्रवीण बनकर , दत्तात्रय बनकर , विस्तार अधिकारी नकाते , चेअरमन तानाजी मुंगूसकर , ॲड दत्तात्रय आडत , दिलीप बनसोडे , केंद्रप्रमुख मुलाणी , मुख्याध्यापक काशिद यांच्यासह ग्रामस्थ , पालक , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .

No comments