मराठीतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अनुराधा पाटील यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान
मराठी भाषा ही वीरांची भाषा आहे. तिला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे, ती शतकानुशतके टिकून राहील. मराठी भाषेतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.ठाकरे बोलत होते.
यावेळी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहूल नार्वेकर, मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments