नितीन आगे केस: सरकारी वकिलांची अचानक माघार
राज्यभर गाजलेल्या नगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणातून विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी माघार घेतली आहे. आगे प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटल्यानंतर राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज यादव पाहत होते. मात्र, त्यांनी वैयक्तिक कारण देऊन हा खटला सोडला आहे. तसे पत्रच त्यांनी राज्याच्या गृहविभागाला व आगे कुटुंबियांना दिले आहे.
No comments