महाराष्ट्रात चार वर्षात २७ हजार नेत्रदान


राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या चार वर्षात 27 हजार 889 नेत्रदान झाले असून आतापर्यंत 74 नेत्रदान केंद्र स्थापित झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने राज्य शासनाच्या समन्वयातून देशभर ‘राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रम’ राबविण्यात येतो. वर्ष 2016-2017 ते 2019-20 आर्थिक वर्षानुसार देशातील 36 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत 2 लाख 64 हजार 695 नेत्रदान झाले आहे.


No comments