भाजपवाले नक्की कोणाचे वंशज आहेत: शिवसेना
औरंगाबादचे संभाजीनगर (Sambhajinagar) झालेच पाहिजे, असा पुकारा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शिवसेनेनं (Shivsena) जोरदार तोफ डागली आहे. 'भाजपला आता हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा जो पुळका आलाय तो का आणि कशासाठी हे लोकांना चांगलं कळतं. बाळासाहेब ठाकरेंनी २५ वर्षांपूर्वीच औरंगाबादचे संभाजीनगर केले आहे. त्यामुळं आता त्यांनी औरंग्याची कितीही पिशाचे उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही,' असं शिवसेनेनं ठणकावलं आहे.
No comments