महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो - मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यात ३० एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ कायम राहणार असल्याचे सांगताना परिस्थिती पाहून काही ठिकाणी हे लॉकडाऊन अधिक कडक केले जाईल, असे संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीची माहिती व घेतलेला निर्णय सांगण्यासाठी श्री. ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.
No comments