मोठी बातमी । दहशतवादी हल्ला झाल्यास पाकला धडकी भरायलाच हवीः हवाई दल प्रमुख


जम्मू- काश्मीरमध्ये आपल्याच मायभूमीत सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांकडून हल्ले होत आहेत. हे हल्ले पाकिस्तानची चिंता वाढवणारे आहेत. काश्मीरच्या हंदवाडामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले. यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर भारताकडून हवाई हल्ला होऊ शकतो अशी पाकिस्तानला भीती आहे, यावरही भदोरिया यांनी भूमिका मांडली. पाकिस्तानने आपल्या भूमितील दहशतवादी कारवाया थांबवल्या तर पाकला अशी भीती कधीच वाटणार नाही, असं भदोरिया म्हणाले.


No comments