अबब ! लॉक डाऊन मध्ये झाली एवढ्या डाळींची खरेदी !


- केंद्र सरकारचा कृषी, सहकार्य आणि शेतकरी कल्याण विभाग टाळेबंदीच्या काळात शेतकरी आणि शेतीविषयक कामांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना करीत आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी टाळेबंदीच्या काळात डाळी आणि तेलबियांच्या खरेदीबाबत अद्ययावत स्थिती स्पष्ट केली.

- टाळेबंदीच्या काळात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) द्वारे झालेली पिक खरेदी -

- 3.17 लक्ष मेट्रिक टन चणाडाळ (चणा) आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश आणि हरयाणा या राज्यांमधून खरेदी करण्यात आली.

- 3.67 लक्ष मेट्रिक टन मोहरी राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात आणि हरयाणा या राज्यांमधून खरेदी करण्यात आली.

- 1.86 लक्ष मेट्रिक टन तूर खरेदी तमिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात आणि ओडिशा या राज्यांमधून करण्यात आली.

- रबी विपणन हंगाम 2020-21 यामध्ये भारतीय खाद्यान्न महामंडळ (FCI) यामध्ये एकूण 277.38 लक्ष मेट्रिक टन गहूची आवक झाली असून त्यापैकी 268.90 लक्ष मेट्रिक टन खरेदी झाली आहे.

- रबी हंगाम 2020-21 यामध्ये अकरा राज्यांमध्ये रबी डाळी आणि तेलबियांची एकूण 3208 नियुक्त खरेदी केंद्रे उपलब्ध आहेत.

- PM-किसान योजनेच्या अंतर्गत 24 मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीत सुमारे 9.25 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला आहे आणि आतापर्यंत 18,517 कोटी रुपये वितरित झाले आहेत.
--------------------------------------------------

No comments