विशेष पॅकेजचा शेतकरी, मजुरांना मोठा फायदाः PM मोदी
देशातील ८ कोटी स्थलांतरीत मजूरांना पुढील दोन महिने मोफत अन्न धान्य दिले जाणार आहे. छोट्या शेतकऱ्यांसाठी नाबार्डकडून ३३ हजार कोटींचे अतिरिक्त भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशा घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या. अर्थमंत्री सीतारामन यांनी आज केलेल्या घोषणांमुळे छोटे शेतकरी आणि स्थलांतरीत मजुरांना फायदा होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. दरम्यान ८०० श्रमिक विशेष ट्रेनद्वारे १० लाखांहून अधिक स्थलांतरीत मजूर आपल्या गावी परतले आहेत.
Post Comment
No comments