लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा

३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही; पण अनेक गोष्टी सुरू होतील: उद्धव ठाकरे

धाेका टळलाय आसे बिलकूल समजू नका...!
The-Chief-Minister-made-a-big-revelation-about-the-lockdown


मुंबई: करोनाचं संकट अद्यापही संपलेलं नाही. त्यामुळे धोका टळलाय असं समजू नका. मी हा शब्द वापरणार नाही. पण स्पष्ट सांगायचं झालं तर ३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही. पण काही गोष्टी आपण हळूहळू शिथिल करणार आहोत, असं सांगतानाच काही गोष्टी शिथिल करणार याचा अर्थ लगेच येत्या १ तारखेपासून सर्व काही अलबेल झालं अशा भ्रमात राहू नका. कुठेही गर्दी करू नका. ज्या भागात गर्दी होईल, त्या भागात पुन्हा पूर्वीसारखाच कडक लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा यांनी दिला. येत्या ३० जूनपर्यंत राज्यातील लॉकडाऊन संपणार आहे. यापार्श्वभूमीवर यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन मागे घेण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र लॉकडाऊन मागे घेण्यात येणार नसला तरी राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि अर्थचक्र गतीमान व्हावं म्हणून अनेक गोष्टीत शिथिलता आणत असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या ३० जून रोजी लॉकडाऊन संपत आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठेल की नाही, याची जनतेला उत्सुकता लागलेली आहे. पण संकट टळलेलं नाही. धोका टळलेला नाही. त्यामुळे स्पष्टच सांगायचं झालं तर ३० जून रोजी लॉकडाऊन उठणार नाही. पण ही परिस्थिती अशीच राहणारही नाही. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवायचा. आपण एक एक पावलं टाकत पुढे जाणार आहोत. हळूहळू सर्व सोयी सुरू करायच्या. अर्थात म्हणजे घराबाहेर बिनधास्तपणे पडायचं असं नाही. केवळ अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण हे सुरू करत आहोत. धोका टळला या भ्रमात राहू नका. आपण करोनाच्या कात्रीत सापडलो आहोत. सर्व अलबेल झालं असं समजू नका. कारण करोना आ वासून बसलाय. अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर पडू नका, असं सांगतानाच मी तुम्हाला सतत काळजी घेण्यासाठी सांगत असतो. काळजी, काळजी, काळजी... तुम्हाला वाटत असेल हे काय काळजी काळजी करतात. पण आपलं सरकार काळजी वाहू नाही. हे सरकार तुमचं आहे. महाराष्ट्राची काळजी घेणारं सरकार आहे. धोक्यापासून सावध करणारं सरकार आहे, असं ठाकरे म्हणाले.

No comments