सोलापूर । दोन दिगग्ज नेत्यांच्या दिलखुलास मुलाखती, वाचा त्यांनी दिलेली उत्तरे सविस्तर....
सुशीलकुमार शिंदे आणि सुभाष देशमुख यांची दिलखुलास मुलाखत
- महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेतर्फे आयोजित सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दोन्ही नेत्यांनी मुलाखतकार विवेक घळसासी यांच्या प्रश्नांना दिलेली दिलखुलास उत्तरे...
सुशीलकुमार शिंदे : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री :
प्रश्न : सुशीलकुमार हे नाव कसे आणि का ठेवले ?
उत्तर :
- प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात मी काम होतो. त्यातूनच पुढे दगडू नावावरून पुढे सुशीलकुमार झालो.
- लहानपणीचे नाव ज्ञानोबा होते पण मुल जगत नसल्याने आईने माझे नाव दगडू ठेवले.
- एका वकीलांचे नाव सुशील नावाचे प्रसिद्ध वकील होते. मी पट्टेवाला असताना मग मी माझे नाव सुशीलकुमार ठेवले.
- रिस्क घेतल्याशिवाय आणि बाहेर पडल्याशिवाय सोलापूरकर प्रगती करत नाहीत.
- इमरजन्सी जॉब योजनेमधून ६ डिसेंबर १९६५ ला माझे PSI म्हणून नोकरी मिळाली.
- १९६९ ला LLB झालो ते माझे स्वप्न होते.
- देवाच्या पायावर डोके ठेवणे हे नाटकाचा भाग असतो.
- लेबर केसेस चालवण्याचा प्रयत्न केला.
- १९८५ सालापर्यंत राजकीय सौहार्द होता. संकुचित वृत्तीने आम्ही राजकीय मंडळी आपापले गट बनवायला लागलो. यामध्ये राष्ट्रीयत्व बाजूला राहिले.
- अटलबिहारी वाजपेयी हे मोठे नेते होते. आम्ही विरोधकांनी मोदी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यावर अटलजी राजधर्म निभाना चाहिए असे म्हणाले होते. त्यावर आडवाणी म्हणाले मोदी का क्या दोष है? हल्ली अटलजी सारखे नेते दुर्मिळ झालेत.
- मी अटलबिहारी वाजपेयी यांचे रेल्वे स्टेशनवर स्वागत केले होते.
- मुरलीमनोहर जोशी यांच्याकडचा किस्सा.
- त्यांच्याकडे रंगपंचमीच्या कार्यक्रमाला जायचो. एकदा उशीरा गेलो होतो.
- बाळासाहेब देवरस यांच्यासोबत १९८५ ला मी नागपूरमधील स्वा. सावरकरांच्या स्मारकाचे उद्घाटन केले होते.
- याविरोधात तत्कालीन खसदारांनी वरिष्ठाकडे तक्रार केली होती.
- त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी इंदिराजी यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांनीही त्या कार्यक्रमाबाबतचे कौतुक केले होते.
- सावरकर हे सोशल रिफॉर्मर होते. त्यामुळे त्यांचे सामाजिक सुधरणेतील योगदान मोठे होते.
- विवेक घळसासी एक चिमणी भारी कशी पडली...?
- २०१२ साली बोरामणी विमानतळ मंजूर होऊन जागा हस्तातरीत केली.
- २०१३ साली एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियासोबत महाराष्ट्र सरकारशी करार केला होता.
- बोरामणी विमानतळासाठी ५ वर्षात मी मुद्दाम प्रयत्न केला नाही. कारण मोदी सरकारमधील लोक सकारात्मक देतील की नाही याबाबत साशंक होतो.
- बडवे म्हंटले की पांडुरंगाच्या पायावर डोकं बडवणारे असेच वाटते.
- मी माझ्या तिनही मुलींना समान मानतो.
- मातृ देवो भव, पितृ देवो भव ही आपली संस्कृती आहे.
प्रश्न विवेक घळसासी : - विरंगुळ्यासाठी आपण काय करता?
- मी साहित्यात रमतो, काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला जातो, तरुणांशी चर्चा करतो.
- गर्दी ही पोकळ असते आपण आपल्या खऱ्या मित्रांशी हितगुज करणे गरजेचे असते.
- वेगवेगळ्या पक्षांना एकत्र कसे आणता येईल याबाबत विचार करावा लागेल.
- मला वाटते की आपले राष्ट्र एकत्र राहील की नाही याबाबत चिंता वाटते. सर्व प्रांत वेगवेगळे होतील की काय असे वाटते.
- हे बदलवण्याची जबाबदारी माध्यमांची आहे.
- सुभाष देशमुखांकडून काही शिकावे असे माझे वय राहिले नाही. पण त्यांच्या सांस्कृतिक कार्याचे कौतुक करतो.
- सोलापूरला राहायला आवडते आणि मुंबई कर्मभूमी
- संघटनात्मक कार्य आवडते. पण मला निवृत्त व्हावे असे वाटते.
========================
सुभाष देशमुख : भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री
- मी तर सुशीलकुमार शिंदे यांच्यापेक्षा गरिबीतून पुढे आलो.
- आमदार कमल विचारे यांच्या बदलापूर येथील पोल्ट्री फॉर्मवर मजूर म्हणून काम केले.
- जोतिराम गायकवाड हे माझे शिक्षक होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सिध्देश्वर कारखान्यावर चिटबॉयच्या हाताखाली काम केले.
- सुरवातीला सुपरवायझर म्हणून काम सुरु केले त्यानंतर खासगी काम घ्यायला सुरुवात केली.
- खासदार लिंगराज वल्याळ, संघचालक शांतीलाल जैन यांनी मला राजकारणात आणले. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक लढवली.
- एकमेकांचे उट्टे काढण्याच्या वृत्तीमुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला.
- हे टाळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना मी व्यक्तीगत पातळीवरुन कपाट भेट दिले.
- २००९ नंतरही मी शरद पवार साहेबांना भेटायला जायचो.
- दिल्लीत त्यांनी मला गाडीत बसवून ४० मिनिटे मनसोक्त गप्पा मारल्या.
- निवडणूक झाल्यावर समाज आणि राष्ट्र हे केंद्रस्थानी मानले पाहिजे.
- सुशीलकुमार शिंदे यांना भेटल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा कॉल आला.
-विवेक घळसासी एक चिमणी भारी कशी पडली...?
- चिमणी पाडण्याचे काम मी केलेय अशी अफवा पसरवली होती. त्यानंतर मी धर्मराज काडादी यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
- दोन्ही देखमुखात काहीही वाद नाहीत. पत्रकारांच्या बातम्यामुळे तशी प्रतिमा झालीय. आम्ही दोघेही अबोल आहोत.
- प्रणिती शिंदे यांचा देशमुखांना प्रश्न
तुम्हाला तुमच्यातील उद्योजक आवडतो की राज्यकर्ता जास्त आवडतो?
- मी व्यवसायात आसतो तर मी खूप श्रीमंत झालो असतो.
- आई वडिलांचे संस्कारातून मी समाजकारणासाठी राजकारण करतो.
- सोलापूर महापालिकेच्या कारभारावर आपण समाधानी नाही.
- समस्येला न्याय देण्याचेव भूमिका सातत्याने करावी लागणार आहे.
- मी लहानपणी एका झव्हेरी समाजाच्या महिलेच्या टोपलीतील साहित्याची चोरी केली आणि ते सामान विकले होते.
- हे घरी कळल्यावर मला सावत्र आईने मला खूप मारले आणि देवासमोर नाक घासायला लावले.
- दिलखुलास हसणे हे शिंदे साहेबांकडून शिकले पाहिजे.
- भाजप की लोकमंगल ? पहिला भाजप.
- शहा की मोदी ? मोदी हे सरस आहेत. दोन्ही नेते
- देवेंद्र की नितीन गडकरी ? राज्यात देवेंद्र केंद्रात नितीनजी.
No comments